वाङ्मय मंडळ

वाङ्मय मंडळाची प्रमुख उद्दिष्टे

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील वाङ्‌मय मंडळ वरील उद्दिष्टानुरुप सातत्याने विविध उपक्रमांचे नियोजन करत असते. साहित्यिक, सांस्कृतिक गुण संवर्धनाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाची संधी विद्यार्थ्यांना मिळावी. त्यायोगे विविध गुणांचे परिपोषण ठरावे या हेतूने वाङ्‌मय मंडळ कार्यरत असते. महाविद्यालयातील होणाऱ्या विविध स्पर्धांना भाग घेण्याची संधी देऊन एक उत्तम व्यासपीठ विद्यार्थ्यांना मिळते. अंतर्गत स्पर्धांखेरीज जिल्ह्यात होणाऱ्या विविध स्पर्धांना जसे की, वक्तृत्व, कथाकथन, अभिवाचन, निबंधलेखन, काव्यलेखन अशा विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून पाठविले जाते. त्याद्वारे त्यांच्या अनुभव विकासनाची उत्तम संधी प्राप्त होते आणि संधी व्यक्तिमत्व विकासाची दारे खुली करत असतात. वाङ्‌मयीन अभिरुची बरोबरच व्यक्तिमत्व विकास हे उद्दिष्ट दृष्टीसमोर ठेवून वाङ्‌मय मंडळाकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. महाविद्यालयीन विश्वात खूप जुनी परंपरा असलेले वाङ्‌मय मंडळ नित्यनूतन रूपाने वाटचाल करते आहे.

डॉ. एस. आर. शिंदे (समन्वयक)

८६०५९८०९८०

Scroll to Top